महाराष्ट्र

भाविकांचे श्रद्धास्थान असणारे श्री क्षेत्र नारायणपूरच्या नारायण महाराजांचे निधन


­पुरंदर : दि.9/9/24 ( सोमवार ) श्री क्षेत्र नारायणपूर येथील सदगुरू नारायण महाराज दीर्घ आजाराने निधन झाले.ते 84 वर्षांचे होते, भारतात त्यांनी चार दिशेस चार दत्तधाम बांधण्याचे काम केले, त्यापैकी एक असणारे श्री क्षेत्र नारायणपूर आहे. ते नेहमीच विविध समाजकार्यात  अग्रेसर होते, त्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याला सातत्याने प्रोत्साहन दिले. व आयोजन करत होते. खेडोपाडयातील गावागावात आपल्या शिष्यांच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्ती चळवळ सुरू केली. आणि ती चळवळ आज चालु आहे, सामुदायिक शेती करणे तसेच श्रमदानातुन विविध उपक्रम राबवत असत.

Advertisement

राज्यात व राज्याबाहेर त्यांचा मोठा भाविक वर्ग आहे. त्यांच्याकडे राजकीय क्षेत्रापासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंतचे भक्तगण होते.  नारायण महाराज व भाविकांमध्ये जिव्हाळ्याचे नाते होते, विविध समाजकार्यात ते नेहमी अग्रेसर असत.

भक्तगण व शिष्य यांना अंतिम दर्शन घेण्याकरिता नारायण महाराज यांचे पार्थिव मंगळवारी (ता. 10) सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत श्री क्षेत्र नारायणपूर मंदिर येथे ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!