राजगड किल्ल्यावर मधमाश्यांच्या हल्ल्यात तरूणी गंभीर जखमी ! बचाव करताना ४० फुट खोल दरीत कोसळली
राजगड : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ल्यावर दि. ९ ऑक्टोबर २०२५ (गुरुवार) रोजी गंभीर अपघात घडला. किल्ल्यावरील संजीवनी माची परिसरात भ्रमंतीसाठी आलेली तरूणी अंजली पाटील वय २४ वर्षे राहणार पुणे या तरुणीवर अचानक मधमाश्यांनी हल्ला केला, या हल्ल्यात तरूणी घाबरल्यामुळे तीने तिचे संतुलन गमावून सुमारे ४० फूट खोल दरीत कोसळली.
या घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीमने तत्काळ बचाव मोहिम सुरू केली. किल्ल्याचा परिसर अत्यंत दुर्गम, उतारदार व अंधाराने भरलेला असल्यामुळे रेस्क्यू मोहिम आव्हानात्मक ठरली. रात्रीच्या काळोखात, निसरडा उतार आणि अडचणीच्या पायवाटींवरून रेस्क्यू चालवणे आवश्यक होते. या घटनेत तरूणीच्या मानक्यामध्ये (पाठीच्या कण्यामध्ये) फ्रॅक्चर झाल्यामुळे ती स्वतः हालचाल करू शकत नव्हती. तातडीने तिच्या बचावासाठी माहिती वेल्हे पोलीस स्टेशनमार्फत वेल्हा-हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम पर्यंत पोहोचवण्याली होती.
अखेर ८–९ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अंजली पाटील हिला स्ट्रेचरच्या साहाय्याने सुरक्षितरीत्या किल्ल्याच्या पायथ्याशी आणण्यात यश मिळाले. त्यानंतर तिला वेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पाटील यांच्या स्वाधीन करून प्राथमिक उपचार दिले गेले. पुढील उपचारासाठी तिला पुणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सुदैवाने तिची प्रकृती स्थिर आहे.
या धाडसी रेस्क्यू मोहिमेत वेल्हा-हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमचे सदस्य तानाजी भोसले, वैभव भोसले, मनोज शिंदे, आकाश झोंबाडे, संजय चोरघे, संतोष जाधव, उत्तम पिसाळ, विक्रम बिरामणे आणि अनिल रेणुसे.सर्व सदस्यांनी एकजूट आणि धैर्य दाखवत, सुरक्षित केला.
या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले की, संगठित बचाव कार्य आणि तत्पर आपत्ती व्यवस्थापन संघ नागरिकांच्या जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.




